फेसबूक वरचं प्रेम...
परवा आमच्या गणोबाचे लग्न जुळल्याची बातमी उडत उडत आमच्यापर्यन्त पोहचली. बरेच दिवस ताटकळला होता. बातमी ऐकून आनंद वाटला. लग्न जुळत नाही म्हणून मध्यंतरी त्याने अविवाहित तरुणांची बैठक बोलाविली होती. मुली मिळत नाहीत म्हणून बैठकीत गणोबाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रस्ताव ठेवला होता पण त्याच्या मित्राने त्याच्या मनसुब्यावर पाणी ओतले होते. निराश गणोबाच्या नशिबात नियतीने मुंडवळया बांधल्या नसाव्यात , असा समज करून घेतला होता. नियती ज्या प्रमाणे एखाद्याचे आयुष्य अपूर्ण ठेवते , त्याच प्रमाणे कोणाच्या येण्याने ते पूर्ण होणार किंवा नाही हे नियतीला पूर्णत: ठाऊक असते. गणोबा आमचा जवळचा खास माणूस. माणूस यासाठी की तो आता तरुण राहिला नव्हता. चंचल स्वभावाचा आणि गोड प्रसन्न सदानकदा. फार फार गरीब , हे तो सांगायचा. आम्ही फक्त ऐकायचो. त्याच्याकडे जे जे होते ते काकणभर देखील आमच्याकडे नव्हते. तरी स्वत:ला गरीब म्हणून घेण्यात धन्य मानी. गरीबीचे कारण सांगताना आम्ही इतके गरीब आहोत की , आम्ही पोहे खातो त्यात शेंगदाणे नसतात. इतके आम्ही गरीब आहोत. शेंगदाणे नसतात मग काय असते रे... त्याला उत्स